Wednesday, October 26, 2011

Diwali Greetings

"जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी हि खरोखरच अलौकिक आहे. हि दिवाळी 
तुमच्या जीवनात नंदाईच्या पावलाने वैभव व सूचितदादांच्या रूपाने सुख व समाधान घेऊन येवो व  
तुमचे सारे जीवन अनिरुद्धमय करो. हीच दत्तबाप्पा, हनुमंत व मोठ्या आईच्या चरणी प्रार्थना!!!"

"अनिरुद्ध दीपावलीच्या अनिरुद्ध शुभेच्छा !!!"





Wednesday, October 19, 2011

मला भेटण्या आला बापू ....................!!!

हरी ओम

मला जळगाव येथील श्री अनिरुद्ध आनंदोत्सवात जायला मिळाले नाही. माझे दोन्ही पायांना fracture असल्यामुळे मला ते शक्य झाले नाही. परंतु श्री अनिरुद्ध आनंदोत्सवाच्या प्रत्येक गोष्टी फेसबुकच्या माध्यमातून अनुभवण्यास येत होती त्यामुळे खूप खुश होतो. बापूंचे मुंबईहून झालेले प्रस्थान ते बापू जळगाव हून निघाल्यापासून मुंबईला पुन्हा पोहचे पर्यंत सगळ्याच गोष्टी फेसबुक वरून अनुभवण्यास मिळाल्या.

श्री अनिरुद्ध आनंदोत्सव संपला नव्हता तर, जळगाव येथील श्रद्धावानांच्या जीवनातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील श्रद्धावानांच्या जीवनात सुरु झाला. खर तर बापू मिळाल्यापासूनच श्रद्धावनाच्या जीवनात आनंदोत्सव येतो. तेही अनिरुद्ध गतीने.

१८ ऑक्टो. संध्याकाळी मला निवाससिंह ह्यांचा मेसेज आला कि- 'बापू कामयानी expess ने येत आहेत व कल्याणला ती ट्रेन ९.५५ला येणार आहे ज्यांना बापूंच्या स्वागतासाठी जायचं असेल ते जाऊ शकतात. शेवटच्या डब्यात बापू आहेत '
मनात तर खूप येत होते कि, आपल्याला जायला मिळाल असत तर किती बर झाल असत बापूंच दर्शन झाल असत. पण ते शक्य नव्हत कारण, मला साधे उभे राहणेही शक्य नाही तर कस होऊ शकेल? शिवाय कल्याण स्टेशन वर जिने चढ- उतरणे आलेच. आणि घरात एकटी आईच असल्यामुळे मला कोण घेऊन जाणार तिथपर्यंत. शिवाय तिथे सर्व श्रद्धावानाची गर्दी असणारच आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे नेहमीची गर्दी तर अजूनच असणार मग तर हे शक्यच नाही. म्हणून मी फक्त विचार करून गप्प बसलो. आणि फेसबुक वरील अपडेट चेक करत होतो.

संध्याकाळचे ८.१५ वाजले होते माझा फोन वाजला
आणि निवाससिंहनि मला सांगितले "९.०० वाजता तयार राहा बापूंना भेटायला जायचे आहे."
मी म्हटलं "अरे कस शक्य आहे मला येण?"
 तर त्याने सांगितलं "तू काही काळजी करू नकोस सगळी arrangement झालेली आहे नाही म्हणू नकोस. "
आणि फोन ठेऊन दिला.

त्याने सांगितल्याप्रमाणे मी ९.०० वाजता तयार राहिलो. तो आणि अजून ३ जन मला घ्यायला आले आणि मला गाडीतून स्टेशन वर आणलं तिथे wheelchair वरून जीन्या वर आणलं. जिन्यावर कोणत्या platform गाडी येणार हे माहित नसल्यामुळे श्रद्धावानाची गर्दी जमलेली होती तेथेच आम्हीहि थांबलो. काही वेळाने सगळे श्रद्धावान platform ४ वर गेले. गर्दी खूप होती म्हणून बापूंच दर्शन होईल कि नाही ह्या विचाराने मी सांशक होतो. हा विचार करत करताच आम्हीही  platform ४ वर जायला निघालो. इतक्यात announcement झाली कि ट्रेन platform ६ वर येत आहे. त्यामुळे आम्ही सगळे जन platform ४ ऐवजी platform ६ वर धक्का बुक्की न करता अगदी आरामात आम्हाला जायला मिळाले.
ट्रेन आल्यावर सगळीकडे बापूंचा जय जयकार सुरु झाला. आणि बापूंच्या बोगीजवळ गर्दी झाली आम्ही मागेच होतो. परंतु बाप्पा मला मुळीच असा सोडणार नव्हता. सगळ्याची बाप्पाच्या दर्शनासाठी झुंबड असताना आणि एवढी गर्दी असताना मला त्या गर्दीतून वाट काढत काढत बापुंपर्यंत नेण्यात आले. "बापूनी एक मस्त गोड स्मितहास्य केल आणि thumbs up करून आशीर्वाद दिले इतकेच नाही तर सावकाश काही काळजी करू नकोस मी (बापू ) आहे ना. असे खुणावले. व २ वेळा मुका घेतला."
एरवी पायाची जास्त हालचाल झाली कि पाय दुखायला लागायचा परंतु एवढ्या गर्दीतून जाऊन आणि पायाला २-३ वेळा धक्का लागूनही मला जराही दुखापत झाली नाही.

मला गर्दीतून बाहेर आणण्यात आले. तेथे पूज्य समीरदादा भेटले समीर दादांनी मस्त हरी ओम केल आणि माझा हात हातात घेऊन  म्हणाले "बिनधास्त एकदम!!!"

ट्रेन अजूनही स्टेशन वरच थांबलेली होती. थोड्यावेळाने बापू आत गेले आणि दरवाज्यावरील गर्दी कमी झाली. मला सगळ्यांनी पुन्हा बापू ज्या दरवाज्यात येणार होते त्या दरवाज्यात आणले. मी बापूंची वाट बघू लागलो इतक्यात ट्रेन सुटणार आणि बापू  धावत धावतच दरवाज्यात आले आणि मला हात दाखवला व पुन्हा २-३ वेळा मुका घेतला. बापूंनी बिनधास्त काही काळजी करू नकोस असे ट्रेन पुढे जात असताना सांगितले.

मी फक्त इच्छा प्रकट केली होती आणि ती त्यानेच सत्यात उतरवली आणि मला जो आनंदोत्सव अनुभवायला मिळाला नाही म्हणून मी रडत होतो. तो त्यानेच माझ्या जीवनात घडवून आणला. मी फक्त एक पाऊल चाललो, खरतर तेही त्यानेच चालविले आणि त्यानेच बाकीची ९९ पावले चालून मला तो भेटायला आला १०८% आणि मी ह्याची देही ह्याची डोळा आनंदोत्सव अनुभवला.



मला भेटण्या आला बापू,
मला भेटण्या आला!!!


श्री राम!!!
श्री राम !!!
श्री राम !!!!!!!!

Thursday, October 13, 2011

अगाध शक्ती अघटीत लीला ....................

हरी ओम,


अगाध शक्ती अघटीत लीला तव सदगुरूराया
जड जीवाते भावी तराया तू नौका सदया

       दिनांक २३ ऑगस्ट २०११ रोजी मला कंपनीच्या कामानिमित्त पुण्याला यावे लागले होते. मी mechanical enigineer म्हणून माझ्या कंपनीत काम करतो. पुण्याला Tower Crane च्या कामासाठी मी आलो होतो ते काम ५ ते ६ दिवस चालणार होत.

       दिनांक २५ ऑगस्ट २०११ रोजी संध्याकाळी मी क्रेन वर चढलो होतो. जेव्हा मी काम करत होतो तेव्हा संध्याकाळचे ७.३० वाजलेले होते. परंतु त्यावेळी माझ्या मनात दुसरेच विचार चालू होते, मी काम तर करत होतो पण त्या विचारांमुळे माझ त्याकडे पूर्णपणे लक्ष नव्हत. आणि अश्यातच अचानक मी ज्या शिडीवर चढलेलो होतो त्या शिडीचा वरचा भाग पिन मधून निघाला आणि अश्यातच माझा तोल गेला. आणि मी काही कळण्याच्या आतच खाली पडलो मी त्यावेळेस बापुरायला हाक सुद्धा मारू शकलो नाही. आजू बाजूला सगळ क्रेन च समान पडलेलं होत. जर मी त्यावर पडलो असतो तर मला कुठे कुठे आणि किती लागल असत ह्याचा अंदाजसुद्धा करता येणार नाही. मी जवळपास १०ते १२ फुटावरून पडलो होतो. अश्या परिस्थितीत मी उभाच्या उभा पडलो जणू काही बाप्पानेच मला पकडल आणि अलगद आणून जमिनीवर ठेवलं. फक्त मला पायाच्या टाचांना मार लागला होता,रक्ताचा एक थेंब सुद्धा निघाला नाही. मी त्यानंतर खाली बसलो बघतो तर इतर कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मार लागला नव्हता.

      पुणे हे शहर माझ्यासाठी अनोळखी होते. आणि माझ्या बरोबर असलेले सहकारी २ घे जन तेही मुंबईचेच होते आणि शिवाय अमराठी होते. त्यामुळे माझे स्नेही व बापुभक्त श्री संदीपसिंह देवकर ह्यांना तसाच बसल्या बसल्या मुंबईला फोन लावला. त्यादिवशी गुरुवार असल्यामुळे ते श्रीहरीगुरूग्राम ला आलेले होते तसेच त्यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर जयेशसिंह शाह होते. संदीपसिंह शी मी बोललो झालेली घटना थोडक्यात सांगितली त्यांनी जयेशसिंह ना फोन दिला आणि मला बोलायला सांगितलं, त्यांनी मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन X-Ray काढायला सांगितले.

       संदीपसिंह ह्यांनी नेहावीर पाताडे ह्यांना घडलेली घटना सांगितली व पुण्याचे बापुभाक्ताना तिथे पोचायला सांगायला सांगितले. नेहावीरा ह्यांची परीक्षा असल्यामुळे त्या श्रीहारीगुरुग्राम ला आलेल्या नव्हत्या त्या घरीच होत्या. त्या Parade consultant असल्यामुळे त्यांच्याकडे पुण्याचे contacts  होते. त्याही पुण्याचे Active DMV म्हणजेच दत्तात्रयसिंह गावडे ह्यांचा नंबर शोधू लागल्या त्यांचा फोनचा प्रोब्लेम झाल्यामुळे त्यांच्याकडे सेव्ह केलेले नंबर डीलीट झाले होते. पण त्या घरीच असल्यामुळे त्यांनी तो नंबर त्यांच्या email मधून काढला आणि पुण्याला फोन लावला.

          ह्या ठिकाणी मी स्वतः सह कर्मचार्यांना रिक्षा आणायला सांगितली व त्यात त्यांनी मला उचलून ठेवले मी उभा देखील राहू शकत नव्हतो एवढ्या प्रचंड वेदना होत होत्या. रिक्षावाल्याने मला जवळच असलेल्या रुबी हॉल क्लिनिक ह्या हॉस्पिटल मध्ये पोचवले. मी त्या हॉस्पिटल मध्ये आलो तेव्हा ८ वाजले होते आणि मी जेव्हा पडलो ती वेळ ७.४५ होती. मला संदीपसिंह यांना फोन करून अवघे १५ मिनिट झाली असतील तोच तेथे रुपेशसिंह सावंत हे पुण्याचे बापुभक्त माझ्याजवळ पोहचले. कोणतेही नेटवर्क फेल झाल तरी मी बापुरायाच्या नेटवर्कमध्ये होतोच. त्यावेळी तो फोन करण्याचे सुचविणारा माझा बापुरायाच होता. त्या एका फोनने सगळे काम केले होते. वास्तविक बघायला गेल तर अनोळखी शहरामध्ये मला एवढ्या तातडीने मदत मिळणे १५ ते २० मिनिटात आणि तेही आपल्या माणसांची हे मी अपेक्षित केल नवत. परंतु माझ्या बापुरायचं नेटवर्क सगळीकडे आहे त्यामुळेच मला लगेच मदत मिळाली.  रुपेशसिंह नीच मला X-Ray काढायला नेल आणि नंतर काही वेळाने तेथे दत्तात्रयसिंह गावडे पोहचले त्यांनी मला खूप आधार दिला. X-Ray रिपोर्ट्स आल्यावर २ही पायाला Fracture असल्याच निदान झाल. त्या हॉस्पिटल मध्ये २- ३ डॉक्टर्सनी मला चेक केल प्रत्येकाने मला विचारल कसं पडलो आणि किती उंचावरून पडलो ते प्रत्येक जन आश्चर्यचकित होऊन एकचं म्हणत होते एवढ्या वरून पडून सुद्धा तुझ्या मणक्याला धक्का सुद्धा कसं लागला नाही. ते एवढाच म्हणत होते " YOU ARE LUCKY ". तो सगळ तारणारा माझ्यासोबत असताना मी LUCKY असणारच ना मित्रानो.

        दत्तात्रयसिंह ह्यांचे मित्र व पुणे केंद्राचे श्रद्धावान डॉक्टर योगेशसिंह खंडाळकर हे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांना दत्तात्रयसिंह  ह्यांनी फोन केला व घडलेले घटना सांगितली व त्यांनी ताबडतोब तेथून निघून दीनदयाळ मेमोरिअल हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. तर तेथे ते आम्ही सगळे पोचण्याच्या आधीच आले होते त्यावेळी रात्रीचे १०.१५ वाजले होते. पण तोपर्यंत मला काहीच माहित नव्हत कि मला नक्की काय झालाय. मला डॉक्टर योगेशसिंह खंडाळकर ह्यांनी व्यवस्थित सांगितलं. तेथे मला त्यांनी प्लास्टर केल २हि पायांना. आणि नंतर नक्की कुठे काही दुसऱ्या ठिकाणी मार लागलेला आहे कि नाही हे चेक करण्यासाठी पूर्ण शरीराचे X-Ray काढण्यासाठी मला पाठवण्यात आल. माझे एकूण ११ X-Ray त्या दिवशी काढण्यात आले, आणि सगळे reports २०-२५ मिनिटात आल्यावर चेक केले तर फक्त टाचा व्यतिरिक्त मणक्याच्या डिस्क २ ठिकाणी बाहेर आल्यासारखे भासत होते म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी MRI काढण्याचा सल्ला दिला. मला नक्की काय झालाय हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं व तसेच डॉक्टर जयेशसिंह शाह ह्यांच्याशी सुद्धा त्यांनी सल्ला घेतला. ते म्हणाले operation करावे लागेल व काही मोठ नाहीये २ही पायात तारा ठोकून हाड नीट बसवली जातील व नंतर २ महिन्यानंतर त्या तारा काढल्या जातील मग तू व्यवस्थित चालू शकतोस.

          डॉक्टर योगेशसिंह ह्यांना २ दिवसासाठी नाशिकला कामानिमित्त जायचं होत व तसेच माझ्या पायाला सूज होती म्हणून आपण operation मंगळवारी करूयात मी सोमवारी येईनच असे म्हणून ते रात्री १.०० वाजता निघाले. तो पर्यंत माझ्यासोबत दत्तात्रयसिंह, रुपेशसिंह व अजून दोघे जन सोबत होते.दत्तात्रयसिंह म्हणाले सूचितदादांनी इथेच उपचार करायला सांगितलेत व नंतर डीसचार्ज दिल्यावर मुंबईला जायचं आहे. माझ्यासोबत सहकर्मचारी असल्यामुळे ते सगळे  रात्री १.३० वाजता हॉस्पिटल मधून निघाले.  मला असह्य वेदना होत होत्या ३ झोपेच्या गोळ्या व जवळपास ४ पेन किलर चे injection देऊन सुद्धा मला ना झोप लागत होती ना वेदना कमी होत होत्या.माझे नामस्मरण सतत चालूच होते. मग शेवटी तिथल्या डॉक्टर्सनी डॉक्टर योगेशसिंह ह्यांना फोनवरून सांगितलं मग त्यांनी सकाळी ४.३० वाजता माझ्या उजव्या पायाला असलेल प्लास्टर कापलं आणि त्यात cotton भरला त्यामुळे मला खूप आराम मिळाला व मग मला शांत झोप लागली.

        दुसऱ्या दिवशी मला भेटायला पुणे केंद्राचे बरेच जन येऊन भेटून गेले परंतु मला त्या दिवशी सकाळी झोपेच्या गोळ्यांमुळे कोण आल व कोण गेल ह्याच काही भान नव्हत. नंतर दुपारी दीड वाजता माझे बाबा पालघर हून तेथे पोचले.
तसेच २७ तारखेला मुंबईहून गुरुप्रसादसिंह सावंत, निवाससिंह शेंडे व सुदर्शनसिंह तिघे जन मला भेटण्यास आले.

       २९ तारखेला सकाळी मला MRI काढण्यासाठी नेण्यात आले. परंतु सगळे reports नॉर्मल आलेले होते. मला मणक्याला कुठेही काही झालेलं नव्हत २ ठिकाणी थोडीशी डिस्क सरकलेली वाटत होती पण डॉक्टर म्हणाले हे नॉर्मल आहे ह्याने काही एक फरक पडत नाही.

       नंतर ३० तारखेला माझ operation करण्यात आले व ते operation सुद्धा डॉक्टर योगेशसिंह ह्यांनीच केल. व नंतर ते म्हणाले operation बापूंच्या कृपेने एकदम व्यवस्थित झालेले आहे त्यांनी मला त्याचे X-Ray ही दाखवले. आणि "श्री राम" म्हणायला सांगितलं.

      मी हॉस्पिटल मध्ये असताना रोज मला कोणी ना कोणी बापुभक्त भेटायला येत होता माझी विचारपूस करत होता. दत्तात्रयसिंह गावडे ह्यांच्या नातेवाईकांना रविवारी दिनांक २८ ऑगस्ट रोजी गाडीचा अपघात झाला होता व त्यातील एक ११ वर्षांची  मुलगी कोमात जाऊन मृत्यूमुखी पडली. अश्या परीस्थित सुद्धा त्यांनी माझ्याकडे कधी दुर्लक्ष केल नाही. ते तिथे तर जातच होते परंतु माझ्याकडे सुद्धा येतच होते. ते माझ्यासाठी का एवढ सगळ करत होते. फक्त त्यांच्या मनात एकाच होत हा बापूचा आहे म्हणजे आपला आहे. हे त्याचं बापुवरच प्रेम बघून मन भारावून गेल.

     हे ही कमीच म्हणून कि काय मला ज्या दिवशी डिस्चार्ज दिला त्या दिवशी सुद्धा मुंबईहून भूषणसिंह कानडे, संतोषसिंह तावडे व कौस्तुभसिंह किस्मतराव हे तिघे जन मला मुंबईला घेऊन येण्यासाठी गाडी करून घ्यायला आले आणि मला मुंबईला आणले.

     बापूंची लीला ही अगाध आहे. बापूनी पुढील काळात माझ्यावर येणारे संकट तर टाळलेच होते परंतु  मला आर्थिक फटका बसू नये म्हणून मला झालेला हॉस्पिटलचा खर्चही कंपनी कडून मिळवून दिला. मला जवळपास १ लाख रुपये खर्च आला होता. जर मी कामावर नसताना पडलो असतो तर मला तो खर्च मिळालाही नसता. परंतु त्यानेच हे सगळे संकट टाळले व मला होणारा आर्थिक खर्चही टाळला.

     आज मी बापूंच्या कृपेने सुखरूप आहे व लवकरच चालता येण्याची वाट बघतो आहे. संस्थेच्या सेवाकार्यात भाग घेण्याची तयारी करतोय. बापूच माझ्याकडून सर्व काही करून घेतील.


अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
श्री राम