हरी ओम,
दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. ह्या वर्षी हा उत्सव श्री हरीगुरुग्राम येथे दिनांक १६ जुलै २०११ रोजी साजरा होणार आहे.
ह्या वर्षी पासून ह्या उत्सवात होणारे काही बदल सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंनी सांगितले आहेत ते पुढीलप्रमाण:-
- ह्या वर्षी उत्सवाची सुरुवात बापू , नंदाई व सूचितदादा श्री नृसिंह सरस्वतींचे पादुका पूजन करून करणार आहेत. हे पूजन चालू असताना गुरुगीतेची सीडी लावण्यात येणार आहे. नंतर ह्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार.
- नेहमी प्रमाणे "साईराम जप " जिथे चालतो त्या ठिकाणी चौकोनी स्तंभ नसून तो त्रिकोणी असणार आहे आणि त्या स्तंभावर बापू, नंदाई आणि सूचितदादा ह्यांच्या प्रतिमा असतील. त्या स्तंभावर कमळ असून त्यात बापूंच्या सदगुरुंच्या पादुका असणार आहेत त्या बंधिस्त असतील त्याचं दर्शन कोणाला घेता येणार नाही. आणि पुर्वावधुत व अपुर्वावधुत असे २ अवधूत कुंभ असतील. ह्या स्तंभाला प्रत्येकाला प्रदक्षिणा घालता येणार आहे.
- ह्या वर्षी पासून श्री त्रिविक्रमाचे पूजन सर्वांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी करता येणार आहे. हे पूजन २ प्रकारचे असणार आहे ज्याचे देणगी मूल्य रुपये ५०१/- व रुपये १००१/- असे असणार आहे ज्याला जे जमेल ते पूजन श्रद्धावान करू शकतो
- ह्या वर्षी पासून दिंडी सोबत पालखी मध्ये श्री सदगुरू अनिरुद्ध बापूंची पदचिन्हे असणार आहेत आणि अभिषेक जलाचा गडू ठेवण्यात येणार आहे. तसेच हि दिंडी भाक्तीगन्गेतून फिरणार आहे. आणि प्रत्येक भक्ताला डोक ठेवून दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
No comments:
Post a Comment